हे गौरीतनया, भालचंद्रा, तुला वंदन करणं, तुझ्यापुढे नतमस्तक होणं यापरतं सुख कशातच नाही हे मी जाणलं आहे.
तुझं आणि माझं अस्तित्व एकरुप व्हावं हीच तर ईच्छा मनीमानसी आहे. पण आपल्यामध्ये हा जो धूमासारखा पातळ पडदा आहे तो माझ्या बुध्दिभ्रमाचाच आहे.
केवळ तुझ्या कृपाशीर्वादानेच हे पटल विरुन जाईल. आणि याच तर क्षणाची मी युगानुयुगे वाट बघतो आहे.
हे अनंतनायका, मझी वाणी, माझे विचार, माझी कृती यापैकी कोणत्याही द्वारे
कुठल्याही विभ्रमाचं आभासी पटल तात्काळ नाहीसं होऊ देत.
या वरदानाच्या प्रतीक्षेत आहे रे मी.
श्रीकुल
भाद्रपद शु. एकादशी शके १९४२
29/8/2020

Tathastu...
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete