Saturday, 19 October 2019

राम

त्यांनी दरडावुन विचारलं
इतकं बावनकशी निखळ सोनं
मिळवलंस तरी कुठुन

मी इतकंच म्हणालो कि,
ते शुभेच्छा देत गेले अन्
मी फक्त साठवत गेलो

तंत्र नाही मंत्र नाही
शस्त्र नाही वस्त्र नाही
लढाई जिंकलीस तरी कशी

मी इतकंच म्हणालो कि,
त्यांनी हे युद्ध आपलंच मानलं
अन शत्रु निमूट माघारी गेला

कद नाही कि पद नाही
डोईवर कुठली टोपी नाही
हा जयकार कसा काय

मी इतकंच म्हणालो कि
त्यांनीच दगडात फुंकला प्राण
अन अंतरी जागला राम

श्रीकुल
विजयादशमी
८/१०/२०१९














No comments:

Post a Comment

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...